उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

सोलापूर – जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांत झालेल्या अतीवृष्टीमुळे सिंमेंटच्या बंधार्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्यांचे बांध वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे हे बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी राज्यशासनाकडून १३ कोटी १० लाख रुपयांचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (अतीवृष्टीमुळे बंधारे वाहून जाणे हे अनाकलनीय आहे. यातून बंधार्यांचा दर्जा योग्य होता का अशीही शंका येते. याविषयीची चौकशी होणे आवश्यक आहे. – संपादक)
पुणे येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २५ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील नादुरुस्त बंधार्यांविषयी बैठक घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, जलसंपदाचे कार्यकारी संचालक टी.एन्. मुंडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह