माझे आजोबा वर ७२ अप्सरांसमवेत व्यस्त असणार !

पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !

भारताच्या नोटिसीनंतर पाकिस्तान सिंधु जल करारातील सुधारणेवर चर्चा करण्यास सिद्ध !

वर्ष २०१७ ते २०२२ या काळात भारताने कराराविषयी ५ बैठका घेतल्या होत्या. त्यात पाकने कधीच भारताची सूत्रे स्वीकारली नाही. त्यामुळेच भारताने पाकला नोटीस बजावली होती. 

टोकियो (जपान) येथील एका उपाहारगृहात अन्नपदार्थ ग्रहण करतांना भ्रमषभाष पहाण्यावर बंदी !

टोकियो येथील ‘डेबू चैन’ नावाच्या एका उपाहारगृहामध्ये अन्नपदार्थ ग्रहण करतांना ग्राहकांना भ्रमणभाष पहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमामुळे उपाहारगृहाच्या मालकाचे कौतुक होत आहे.

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे !’ – ओआयसी

ओआयसीचे निवेदन म्हणजे धर्मांध मानसिकतेचा नमूना ! – भारताने फटकारले

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांचे सरकार रामायणाशी संबंधित ठिकाणे ओळखून त्यांना पर्यटन स्थळे बनवण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे

श्रीलंका रामायणातील घडामोडींची साक्ष देणार्‍या स्थळांचा विकास करणार !

कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !

पाकिस्तान सरकारकडून न्यायाधिशांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न !

‘तुम्ही संसदेत गेलात, तर असे लोक तिथे संसदेला संबोधित करतांना दिसतील, जे कालपर्यंत कारागृहात होते आणि जे देशद्रोही आहेत.’ – सरन्यायाधीश उमर अता बंदियाल

टि्वटरचे चिन्ह (लोगो) पालटले !

‘टि्वटर’ची धुरा संभाळणारे उद्योगपती इलॉन मस्क यांनी टि्वटरचे चिन्ह (लोगो) पालटले. त्यांनी निळ्या चिमणीच्या चित्राऐवजी आता कुत्र्याचे चित्र चिन्ह प्रसारित केले आहे.

शारदा पीठासाठी सुसज्ज मार्ग बनणार !

पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

माझ्या पूर्वजांनी भारतातून पाकिस्तानात येण्याची घोडचूक केली ! – पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी

भारतात रहाणार्‍या पाकप्रेमी मुसलमानांना याविषयी काय म्हणायचे आहे ? भारतातील पाकप्रेमी त्यांच्या पाकमधील धर्मबांधवांच्या साहाय्यासाठी पाकमध्ये गेल्यास पाकमधील समस्या सुटतील आणि त्याहून अधिक भारताचीही समस्या सुटेल !

भारताचा राष्ट्रध्वज उतरवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

जर त्यांनी आपल्या दूतावासांना सुरक्षा पुरवली नाही, जर त्यांनी हे सगळे गांभीर्याने घेतले नाही, जर अशा घटना तिथे घडत असतील, तर मग भारताकडूनही त्यांना उत्तर दिले जाईल, असा दमही डॉ. एस्. जयशंकर यांनी दिला.