महिला आरक्षण आणि विकास !
भारताचा इतिहास पहाता स्वबळावर कर्तृत्व गाजवणार्या महिलांची संख्या मोठी आहे. अशा कर्तबगार महिलांमुळे केवळ महिलांचेच नव्हे, तर समाजाचेही भले झाले आहे. त्यामुळे कर्तृत्ववान, विविध गुणांचा समुच्चय असणारी महिला केवळ राजकीयच काय, तर कुठलेही क्षेत्र गाजवू शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.