प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मागणी

नवी देहली – देशात केवळ गोमांसच नाही, तर मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे. सरकारांनी अनेक ठिकाणी गोमांसावर बंदी घातली आहे; परंतु अनेक ठिकाणी ते अजूनही कायदेशीर आहे. ईशान्येकडील लोक ते उघडपणे खाऊ शकतात; पण उत्तर भारतात नाही, असे विधान प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. या वेळी त्यांनी समान नागरी कायद्याचे कौतुक केले.
समान नागरी कायद्याविषयी खासदार सिन्हा म्हणाले की, जे नियम उत्तर भारतात लागू केले जाऊ शकतात, ते ईशान्येकडील राज्यांमध्ये लागू केले जाऊ शकत नाहीत. तसेच समान नागरी कायद्यामध्ये अनेक बारकावे आणि पळवाटा आहेत. या कायद्यातील तरतुदींचे प्रारूप सिद्ध करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !