काँग्रेसला बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांची झाली जाणीव !

नवी देहली – बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्यांकांचा, विशेषतः आपल्या हिंदु बंधू-भगिनींचा सतत छळ केला जात आहे. तेथे अल्पसंख्यांकांवर सतत अत्याचार होत आहेत. हिंदु नेते भावेश चंद्र रॉय यांची हत्या, ही नरेंद्र मोदी यांची बांगलादेशाच्या मुख्य सल्लागारांसमवेतची बैठक अयशस्वी झाल्याचा पुरावा आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पोस्ट प्रसारित करत केली आहे.
खर्गे पुढे म्हणाले की, भारत सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरानुसार, मागील २ महिन्यांत हिंदूंवर ७६ आक्रमणे झाली, ज्यामध्ये २३ हिंदू मारले गेले. इतर धार्मिक अल्पसंख्यांकांवरही आक्रमणे चालूच आहेत. अलीकडेच बांगलादेशाच्या मुख्य सल्लागारांनी भारतातील ईशान्येकडील राज्यांविषयी अत्यंत निंदनीय आणि निराशाजनक टिप्पणी केली. बांगलादेशामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि वर्ष १९७१ मधील मुक्ती युद्धाच्या आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न, हा भारत अन् बांगलादेश यांच्यामधील संबंध डळमळीत करण्याचा प्रकार आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेश असो कि बंगाल, हिंदूंच्या रक्षणाविषयी काँग्रेसने बोलणे म्हणजे नक्राश्रूच होत ! |