वणी (जिल्हा यवतमाळ) येथे वादळात घरांचे छप्पर उडाले !
वणी, १९ एप्रिल (वार्ता.) – येथे १८ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून वादळाला प्रारंभ झाला. यामुळे अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले, झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. तारा तुटल्या. रात्रभर वीज नसल्याने अनेकांनी रात्र जागून काढली. हा अनुभव येथे प्रथमच आला.
वसई येथे ५०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांकडून दीक्षा !
वसई (ठाणे) – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली १९ एप्रिल या दिवशी येथे ५०६ जणांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश घेतला आहे. आतापर्यंत १ लाख ५१ सहस्र २७८ जणांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे.
‘ख्रिस्ती मिशनर्यांनी हिंदूंचे धर्मपरिवर्तन केले होते; पण मी त्यांना सनातन धर्माची दीक्षा देऊन पुन्हा हिंदु धर्मात घेतले आहे’, असे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी सांगितले.