भारताला कमी लेखले जाऊ शकत नाही ! – खासदार शशी थरूर, काँग्रेस

शशी थरूर यांचा राहुल गांधी यांना घरचा अहेर !

काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर

ह्यूस्टन (अमेरिका) – भारतात जे काही घडत आहे, त्याचा परिणाम जगातील एक षष्ठांश लोकसंख्येवर होतो. क्रयशक्तीच्या संदर्भात भारत ही जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. यापुढे जागतिक स्तरावर भारताकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, तसेच त्याला कमीही लेखले जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर यांनी दिली. ते ह्यूस्टन येथील ‘बेकर इन्स्टिट्यूट ऑफ राइस युनिव्हर्सिटी’मध्ये विद्यार्थ्यांशी आयोजित केलेल्या संवाद सत्रात बोलत होते.

काँग्रेसने नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून ते तेथे विविध भारतविरोधी वक्तव्ये करून भारताला कमी लेखत आहेत, तसेच भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर थरूर यांचे वरील वक्तव्य म्हणजे गांधी यांना घरचा अहेर असल्याचे बोलले जात आहे.