पुतळ्याच्या संदर्भात झालेली गोष्ट कमीपणाचीच ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – पुतळ्यावरून कुणीही राजकारण करू नये. झाली ती गोष्ट कमीपणाची आहे. नौदलाच्या साहाय्याने पुन्हा मोठा पुतळा उभारू. ही गोष्ट राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही, हे सर्व जण जाणतात, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पत्रकारांनी त्यांना पुतळ्याच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले.

नौदलाने चौकशी समिती आणि पथक सिद्ध केले आहे. हे पथक पुतळा पडला तेथे येऊन गेले, असेही त्यांनी पुढे सांगितले.

‘पुतळा कोसळल्याविषयी मी महाराष्ट्रातील जनतेची क्षमा मागतो’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.