
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे’. शरीर आरोग्यसंपन्न असल्यास साधनेत शारीरिक अडचणी येत नाहीत. शरीर सात्त्विक ठेवल्यास साधनेत शीघ्रतेने प्रगती होते. ‘शरीर सात्त्विक कसे ठेवायचे ?’, ते ॲलोपॅथी नव्हे, तर आयुर्वेद शिकवतो.
‘हिंदु राष्ट्रात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय येथे ‘आयुर्वेद’ हा विषय लहानपणापासून शिकवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना लहानपणापासूनच आरोग्याविषयी माहिती ज्ञात होऊन ते रोगराईपासून दूर रहातील.’
आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा !
‘म्हातारपणी सांधे दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी आजार झाले की, आधुनिक वैद्य (डॉक्टर) व्यायाम, योगासने इत्यादी करायला सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजार झाल्यावर व्यायाम करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून व्यायाम करणे अधिक लाभदायक असते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !