
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आपण धर्मनिरपेक्ष ही संकल्पना स्वीकारली आहे. निवडणुकीला उभे रहातांना जी शपथ घेतली जाते, त्यात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आहे. असे असतांना निवडणुकीत एखादा धर्म किंवा धार्मिक प्रश्न उभा करणे आणि त्यातून वेगळे वातावरण निर्माण करणे हे देशाच्या दृष्टीने अयोग्य आहे. देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. येथे ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘जय बजरंग बली’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. (देवतांच्या नावाच्या घोषणा दिल्या, तर धर्मनिरपेक्षता भंग कशी होते ? मग मुसलमानांचे लांगूलचालन करतांना ती भंग होत नाही का ? – संपादक)
‘धार्मिक मुद्दे को उठाना अच्छी बात नहीं’, कर्नाटक में PM मोदी के चुनाव प्रचार पर बोले शरद पवार#KarnatakaElections #PMModi #SharadPawar https://t.co/y9O3qnhV2P
— ABP News (@ABPNews) May 8, 2023
गुरसाळे (तालुका पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त अध्यक्ष शरद पवार हे पंढरपूर येथे आले होते.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले