
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आपण धर्मनिरपेक्ष ही संकल्पना स्वीकारली आहे. निवडणुकीला उभे रहातांना जी शपथ घेतली जाते, त्यात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आहे. असे असतांना निवडणुकीत एखादा धर्म किंवा धार्मिक प्रश्न उभा करणे आणि त्यातून वेगळे वातावरण निर्माण करणे हे देशाच्या दृष्टीने अयोग्य आहे. देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. येथे ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘जय बजरंग बली’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. (देवतांच्या नावाच्या घोषणा दिल्या, तर धर्मनिरपेक्षता भंग कशी होते ? मग मुसलमानांचे लांगूलचालन करतांना ती भंग होत नाही का ? – संपादक)
‘धार्मिक मुद्दे को उठाना अच्छी बात नहीं’, कर्नाटक में PM मोदी के चुनाव प्रचार पर बोले शरद पवार#KarnatakaElections #PMModi #SharadPawar https://t.co/y9O3qnhV2P
— ABP News (@ABPNews) May 8, 2023
गुरसाळे (तालुका पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त अध्यक्ष शरद पवार हे पंढरपूर येथे आले होते.
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती