
जम्मू – जम्मू-काश्मीरमधील हिंदूंविषयी सरकारची उदासीनता आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला अजूनही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. सरकार त्यांना ‘निर्वासित’ असे संबोधते. काश्मीरमधील नरसंहाराकडे सतत दुर्लक्ष केले जाते किंवा ते नाकारले जाते, असे प्रतिपादन काश्मिरी हिंदूंसाठी कार्य करणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय श्रुंगू यांनी केले. ते जम्मूमधील रूपनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. पी.एल्. बडगामी, श्री. बी.एल्. धर आणि पी.एल्. रैना उपस्थित होते. काश्मिरी हिंदूंविषयी ‘पनून कश्मीर’ने सरकारला अनेक सूचना केल्या आहेत; परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी खंतही डॉ. श्रुंगू यांनी व्यक्त केली.
सौजन्य टेक वन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बेहारीलाल कौल यांनी केले. या मेळाव्यात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक