
सागर (कर्नाटक) – बीदर आणि शिवमोग्गा येथे जानवेधारी विद्यार्थ्यांना ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी मज्जाव केल्याच्या घटना घडल्यानंतर, आता शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर येथे विद्यार्थ्याचे जानवे कापल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या संदर्भात विद्यार्थ्याच्या वडिलांनी सागर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
सागर तालुक्यातील हळेइक्केरी गावातील श्रीनिवास राव यांचा मुलगा पार्थ हा शहरातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी गेला होता. परीक्षा कक्षाबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी तपासणी करतांना त्याचे जानवे पाहिले आणि ‘तू ब्राह्मण आहेस का?’ अशी विचारणा केली. ‘परीक्षा द्यायची असेल, तर हे जानवे काढावे लागेल,’ असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्याने विरोध केला, तरी त्याचे जानवे कापून त्याला परीक्षा कक्षात पाठवले. विद्यार्थ्याने नाइलाजाने आणि उदास मनाने परीक्षा दिली अन् घरी आल्यावर याविषयी सांगितले. या घटनेला उत्तरदायी असलेले सुरक्षारक्षक, परीक्षा पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत केली आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष चालूच ! |