
मथुरा (उत्तरप्रदेश) – भारतात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; पण आमच्या धर्मावर कुणी आक्रमण केले, तर त्याला असे प्रत्युत्तर दिले जाईल की, पळता भुई थोडी होईल, अशी प्रतिक्रिया भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी येथे व्यक्त केली. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.
साध्वी प्रज्ञा बोलीं-बागेश्वर वाले बाबा की शक्तियां सबको नहीं मिलतीं: धर्म पर आक्रमण किया तो ऐसा जवाब देंगे कि न जमीन मिलेगी न आसमानhttps://t.co/48xBZnXfC2#Pragyathankur #bagheshwardham #Prayagraj pic.twitter.com/AaR1qWvpUR
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) February 3, 2023
खासदार साध्वी प्रज्ञासिंह पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याविषयी म्हणाल्या की, धर्मविरोधी लोक सनातन धर्मावर आक्रमणे करतात. त्याचा सनातन धर्मावर कोणताही परिणाम होणार नाही. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या माध्यमातून हिंदु आणि हिंदुत्व वाढत आहे. भारत विश्वगुरु होता. भविष्यातही भारतमातेला परमवैभवावर पोचवून भारत विश्वगुरु पोचेल. याच अनुषंगाने धीरेंद्रकृष्ण शास्त्री काम करत आहेत.
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court