आसाममध्ये बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक

उजवीकडे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (गुवाहाटी) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या आदेशानंतर आसाम पोलिसांनी राज्यभरात बाल विवाहांच्या प्रकरणी १ सहस्र ८०० जणांना अटक केली आहे. राज्यात बाल विवाहाच्या संदर्भात ४ सहस्रांहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.