
९ ऑक्टोबर या दिवशी कोजागरी पौर्णिमेसमवेत ‘ईद-ए-मिलाद’ हा मुसलमानांचा उत्सवही होता. बंगालमध्ये मोमीनपूर येथे, जोधपूर येथे आणि महाराष्ट्रात धुळे येथे या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकांमध्ये मुसलमानांकडून दंगलसदृश वातावरण निर्माण करण्यात आले. मोमीनपूर येथे प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड करण्यात आली, तर जोधपूर अन् धुळे या ठिकाणी ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. देशभरात अशा घटना अन्य ठिकाणीही घडल्या असल्याची किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिंदूंचे सण किंवा त्यांच्या संतांचे जन्मोत्सव आनंददायी वातावरण निर्माण करतात. मुसलमानांच्या श्रद्धास्थानांच्या जन्मोत्सवाच्या वेळी (मिलाद-उन-नबी) मात्र धर्मांध मुसलमानांचा इतरांविषयी असणारा द्वेष कृतीच्या स्तरावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो, हे या घटनांतून लक्षात येते. मोमीनपूर येथे अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड केल्याने पुष्कळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे सैन्यदल बोलवावे लागले. धर्मांध मुसलमान हिंदूंच्या सणांच्या वेळी निघालेल्या मिरवणुकांवरही आक्रमणे करून हिंदूंना त्रास देतात आणि आता त्यांच्या मिरवणुकांच्या वेळीही ते हिंदूंनाच त्रास देतात. धर्मांध जिथे जिथे संख्येने एकत्र येतात, तिथे हिंदूंवर काही ना काही अत्याचार करण्याच्या कृती करतात, हेच यातून वारंवार पुढे येते. धर्मांध मुसलमानांनी दंगली केल्यानंतर झालेल्या हानीची भरपाईही त्यांच्याकडून वसूल करणे महाकठीण काम असते. राजकीय नेतेही मतांसाठी त्या दृष्टीने उदासीन असतात आणि पोलीसही त्यात अनेक कारणांमुळे लक्ष घालत नाहीत. आझाद मैदान दंगलीमध्ये झालेल्या प्रचंड हानीची भरपाई अद्याप वसूल करणे शक्य झालेले नाही. कित्येकदा दंगलींचे अहवाल सिद्ध होईपर्यंत कित्येक पुरावेही नष्ट झालेले असतात. या संदर्भातील खटले अनेक वर्षे चालू रहातात, असे मोमीनपूरच्या घटनेच्या संदर्भातही होण्याची दाट शक्यता आहे. बंगालमध्ये पूर्णतः मुसलमानधार्जिणे ममताबाईंचे सरकार असल्याने या दंगलीतील मुसलमान दंगेखोरांना शिक्षा होण्याची शक्यता अल्पच आहे. जोधपूर येथे मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या, तेव्हा तिथे पोलीस उपलब्ध होते; तेही त्यांना थांबवू शकले नाहीत किंवा त्यांना त्यांनी थांबवले नाही, हे सत्य आहे. एकूण काय ? कायदा, पोलीस किंवा शिक्षा कसलाच धाक नसल्यामुळे धर्मांधांचे फावले आहे. त्यामुळे हिंदूंचा सण काय किंवा मुसलमानांचा सण काय, हिंदूंच्याच डोक्यावर ‘आता या वेळी काय होणार ?’, ही टांगती तलवार कायम रहाते. ही स्थिती हिंदूंना पालटायची असेल, तर आता हिंदूंनी जागृत आणि संघटित होऊन उपाययोजना काढण्याला पर्याय नाही. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे हिंदूंना किती अपरिहार्य आहे, हे या घटनांवरून पुन्हा पुन्हा लक्षात येते. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या तरुण वयात सर्व गोष्टी बाजूला ठेवून १ वर्ष केवळ शरीर बळकट करण्यास प्राधान्य दिले होते. आता स्वराज्य आले, तरी पोलीस किंवा सरकार हिंदूंचे रक्षण करण्यास असमर्थ आहे, हे लक्षात घेऊन धर्मांधांच्या दंगली आणि त्यांतून दिल्या जाणार्या ‘सर तन से जुदा’च्या धमक्या यांना तोंड देण्यासाठी हिंदूंनी शारीरिक बळ वाढवणेही किती अपरिहार्य आहे, हे त्यांच्या लक्षात यायला हवे.
सर्व आक्रमणे हा ‘गजवा-ए-हिंद’चा भाग !
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आतंकवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर वर्ष २०४७ पर्यंत संपूर्ण भारतावर मुसलमानांचे राज्य आणायचे त्यांचे षड्यंत्र होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यासाठी त्यांनी आखलेल्या ‘गजवा-ए-हिंद’ या मोहिमेविषयी पुरावेही यंत्रणांना मिळाले.

अर्थात् ‘१४ टक्के लोकसंख्या असलेले मुसलमान ८० टक्के हिंदु असणार्या प्रदेशावर वर्चस्व कसे गाजवणार ?’, असे कुणालाही वाटेल; परंतु आज ज्या गतीने राज्ये आणि त्यांतील छोटे छोटे प्रदेश मुसलमानबहुल होत आहेत, ती गती पहाता येत्या काही वर्षांत त्यांची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे देशी आणि विदेशी तज्ञ सांगत आहेत. दुर्दैवाने हिंदू जाती आणि पक्ष यांत विभागले गेले आहेत अन् म्हणून ते असंघटित आहेत. धर्मांध मुसलमानांवर वचक नसल्यानेच ‘हिंदूंचे गळे कापा’ अशा उघडपणे घोषणा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. जसे धर्मांधांना हिंदूंशी भांडणे उकरून काढायला, हिंदूंवर आक्रमण करायला आणि दंगली करायला कुठलेही क्षुल्लक निमित्त पुरते, तसेच आता या घोषणाही त्यांच्या कार्यक्रमाची अविभाज्य कृती बनवल्याप्रमाणे सर्रास दिल्या जात आहेत. या हिंदूबहुल देशाच्या सरकारने या घोषणेवर तात्काळ बंदी आणली पाहिजे आणि पोलिसांना अशा घोषणा देणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊन त्यांना तत्परतेने कडक शासन केले पाहिजे; अन्यथा आज सणावाराला आणि बहुसंख्येने एकत्र जमल्यावर हिंदूंना मारण्याच्या धमक्या देणारे धर्मांध उद्या मशिदीवर प्रतिदिन अशा घोषणा भोंग्यावर लावतील, तो दिवस दूर रहाणार नाही. हिंदूंच्या भूमी बळकावणे, त्यांची घरे बळकावणे, शासकीय भूमींवर नियंत्रण मिळवणे, ठिकठिकाणी अवैध मजारी बनवून तिथे उरुस आदी कार्यक्रम करून वहिवाट निर्माण करणे, एखाद्या प्रदेशातील त्यांची संख्या वाढवून तेथील हिंदूंना जिणे नकोसे करणे, रस्त्यांवर नमाज पढून वाहतूककोंडी करणे, गडांवर आक्रमणे करणे, काँग्रेसच्या काळात हवे तसे कायदे करायला लावून वक्फ बोर्डाने बळकावलेल्या भूमी आदी माध्यमांतून होणारा ‘लँड जिहाद’ हा ‘गजवा-ए-हिंद’चाच एक भाग आहे. देशभर पसरलेले लव्ह जिहादचे अक्राळविक्राळ स्वरूप, ‘जे.एन्.यू’सारख्या विद्यापिठातून दिल्या जाणार्या देशविरोधी घोषणा आणि त्यानंतर देहली येथे झालेल्या दंगली हा सारा ‘गजवा-ए-हिंद’चा भाग आहे.

धर्मांध मुसलमान आता ‘सर तन से जुदा’ धमकीच्या माध्यमातून केवळ समाजात दहशत निर्माण करत नाहीत, तर पुढे त्याची कृतीही करत आहेत. गेल्या काही दिवसांत हिंदूंच्या खरोखरच हत्या झाल्या आहेत. आता मिरवणुकांतून उघडपणे हिंदूंना मारण्याच्या घोषणा झाल्या, तर पुढे हिंदूंना किती कठीण काळ आहे, हे लक्षात घेता आले पाहिजे.
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
भोर (पुणे) येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न !
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !