झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी बाँबद्वारे रेल्वे रुळ उडवल्याने वाहतूक बंद !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवादी संपुष्टात न आणणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

घटनास्थळ

गिरिडीह (झारखंड) – येथे नक्षलवाद्यांनी २६ जानेवारीच्या मध्यरात्री रेल्वे रुळ बाँबद्वारे उडवल्याची घटना घडली. यामुळे हावडा-गया-देहली रेल्वे मार्गावर गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली, तर काही गाड्यांचा मार्ग पालटण्यात आला.