|
२५ वर्षांनी निकाल लागणे, हे भारतीय न्यायपालिकेला भूषणावह नाही, असेच जनतेला वाटेल !

बेंगळुरू (कर्नाटक) – गेल्या २५ वर्षांपासून चालू असलेल्या नवस मुंडन प्रकरणाच्या वादावर शेवटी पडदा पडला आहे. मुंडन उत्पन्नाचा संपूर्ण अधिकार देवालयाला देण्यात आला आहे, तर केवळ मुंडनाचे कार्य नयनज क्षत्रिय संघाला दिलेे आहे. येथील दिवाणी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
श्रीकंठेश्वर स्वामींच्या क्षौरकर्म कट्ट्यावर मुंडन करण्याचे कार्य करणार्या नयनज क्षत्रिय संघाच्या सदस्यांनी ‘आम्ही वंशपरंपरेने नवसाच्या मुंडन कार्यात जोडलेलो असून क्षौरकर्म कट्ट्यावर संघाचा अधिकार आहे’, असे सांगत क्षौरकर्म कट्ट्यावरील सर्व उत्पन्न संघाने स्वतःकडे घेतले. त्यामुळे देवालय हुंडीची लाखो रुपयांची हानी होऊ लागली. देवालय व्यवस्थापन समितीने मुंडन सेवा देवालयाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी लढा देत होती. या संदर्भात २५ वर्षांपूर्वी संघाने नरसिंहपूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने वरील निर्णय दिला.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !