कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मे मासामध्ये दीड कोटी भारतियांनी नोकरी गमावली !

कोरोनाची लाट हा आपत्काळ आहे आणि त्याहून अधिक तीव्र आपत्काळ पुढे येणार आहे, असे संत सांगत आहेत, हे पहाता साधना करण्याला आणि देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !

नवी देहली –  कोरोना महामारीमुळे मे मासामध्ये सुमारे दीड कोटी भारतियांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सी.एम्.आय.ई.च्या) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालानुसार एप्रिल मासामध्ये ३९ कोटी ७० लाख लोकांकडे रोजगार होते; मात्र मे मासामध्ये या संख्येत घट होऊन ती ३७ कोटी ५० लाखवर आली आहे.  बेरोजगारीचा दर मे मासामध्ये १२ टक्के होता, तर एप्रिलमध्ये ८ टक्के होता. एप्रिल आणि मे मासांमध्ये कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव असतांना नोकर्‍यांमध्येही मोठ्या प्रमाणात कपात चालू होती. आकडेवारीनुसार कोट्यवधी बेरोजगारांपैकी ७ कोटी ७ लाख जण रोजगाराच्या शोधात होते; परंतु संधी अल्प असल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही.