
सांगली – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ मे या दिवशी सांगली जिल्ह्यात चालू झालेली कडक दळणवळणबंदी टप्प्याटप्याने २६ मेअखेर वाढवण्यात आली होती. यात परत एकदा १ जूनअखेर वाढ करण्यात आली आहे. किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत ग्राहकांना घरपोच सेवा देण्यास अनुमती देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशात पुढे म्हटले आहे की, शेतीविषयी सेवा आणि शेती चालू रहाण्यासाठी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे अन् त्यांची दुरुस्ती, देखभाल पुरवणार्या सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू रहातील. या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस वाहतूक सेवा जिल्ह्यांर्तगत पूर्णपणे बंद रहाणार आहे. २५ नागरिकांच्या उपस्थितीत २ घंट्यांच्या कालावधीत विवाह समारंभ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !