|

नवी देहली – भारताची राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे. यासाठी त्यांनी द्रौपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिसरा यांनी केलेल्या संशोधनाचा हवाला दिला आहे.
‘इंद्रप्रस्थ’ नाव करेपर्यंत देशात वाद चालू रहाणार असल्याचे ऋषींनी सांगितल्याचा दावा !
डॉ. स्वामी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, डॉ. नीरा मिसरा यांच्या संशोधनातून सापडलेली तथ्ये राजधानी देहलीचे पुन्हा नामकरण करण्यासाठी पुरेशी आहेत. तमिळनाडूतील एका महान ऋषींनी मला सांगितले की, जोपर्यंत देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ केले जात नाही, तोपर्यंत देशामध्ये वाद चालू रहातील.
Hindu Renaissance requires the renaming of New Delhi as Indraprastha. Research of Dr. Neera Misra of https://t.co/JNHCgHes1m is sufficient for renaming. A great sage in Tamil Nadu told me that unless the Capital of India is named Indraprastha, we shall remain a nation in conflict
— Subramanian Swamy (@Swamy39) May 21, 2021
महाभारत, तसेच ब्रिटीश आणि मोगल यांच्या काळात इंद्रप्रस्थाचा उल्लेख !
डॉ. नीरा मिसरा यांनी त्यांच्या संशोधनामध्ये अनेक पुरावे गोळा केले आहेत, ज्याद्वारे देहलीचे पूर्वीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ होते. यात महाभारताचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच वर्ष १९११ च्या इंग्रजांच्या अधिसूचनेमध्येही याचा उल्लेख आहे. ब्रिटीश, तसेच मोगल यांच्या शासन काळातील महसूल आणि अन्य नोंदीमध्ये देहलीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ असल्याचेही उल्लेख आहेत.
Popular Front Of India : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
Panchkula Bomb Threat : पंचकुला (हरियाणा) महापौर कार्यालयासह हरियाणा आणि देहलीतील मंदिरे बाँबने उडवण्याची धमकी
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
प्रबल प्रताप सिंह जुदेव प्रतिष्ठित ‘हिंदु केसरी’ पुरस्काराने सन्मानित !