जनतेने स्वयंशिस्त न पाळल्याचा परिणाम !

कोल्हापूर – येथील बहुचर्चित अतिक्रमण विरोधी कारवाई ११ फेब्रुवारी या दिवशी चालू करण्यात आली आहे. कपिलतीर्थ मार्केट पासून चालू झालेल्या या कारवाईने संपूर्ण ताराबाई रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे. १ घंट्याच्या कालावधीत ५० हून अधिक खोकी, केबिन्स महापालिकेने जप्त केली. दुकानांच्या बाहेर आलेल्या छपरांवरही हातोडा मारण्यात आला. महापालिकेने खोकी उचलण्यास आरंभ करताच अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणे, खोकी, केबिन्स काढून घेतली. फेरीवाल्यांना गत ८ दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी ऐकले नसल्याने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह प्रशासनाने थेट खोकी उचलून नेली.
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !