जनतेने स्वयंशिस्त न पाळल्याचा परिणाम !

कोल्हापूर – येथील बहुचर्चित अतिक्रमण विरोधी कारवाई ११ फेब्रुवारी या दिवशी चालू करण्यात आली आहे. कपिलतीर्थ मार्केट पासून चालू झालेल्या या कारवाईने संपूर्ण ताराबाई रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे. १ घंट्याच्या कालावधीत ५० हून अधिक खोकी, केबिन्स महापालिकेने जप्त केली. दुकानांच्या बाहेर आलेल्या छपरांवरही हातोडा मारण्यात आला. महापालिकेने खोकी उचलण्यास आरंभ करताच अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणे, खोकी, केबिन्स काढून घेतली. फेरीवाल्यांना गत ८ दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी ऐकले नसल्याने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह प्रशासनाने थेट खोकी उचलून नेली.
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !