असे अधिवक्ते अशीलाला न्याय कसे मिळवून देत असतील ?

भिवंडी, १ फेब्रुवारी (वार्ता.) – एका खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी भिवंडी न्यायालयात चालू असतांना आरोपी आणि फिर्यादी यांची दोन्ही अधिवक्ते त्यांची बाजू मांडत होते. त्या वेळी न्यायाधिशांच्या समोरच अधिवक्ता शैलेश गायकवाड आणि अधिवक्ता अमोल कांबळे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीमध्ये झाले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी दोन्ही अधिवक्त्यांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. अधिवक्ता अमोल कांबळे यांनी अधिवक्ता शैलेश गायकवाड यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
या घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच घटनेचे वार्तांकन करण्यासाठी ‘एबीपी माझा’चे पत्रकार अनिल वर्मा गेले असता या गोष्टीचा राग अधिवक्ता गायकवाड यांना आल्याने त्यांनी वर्मा यांना शिवीगाळ केली आणि ‘बातमी लावली तर तुला बघून घेईन’, असे धमकावत पोलीस ठाण्यासमोर मारहाण करण्यास आरंभ केला. ‘आम्ही दिलेल्या बातम्या तू लावत नाहीस आणि आमची बातमी कशी लावतो तेच बघतो’, अशी धमकी त्यांना दिली. या प्रकरणात पत्रकार अनिल वर्मा यांच्याकडून अधिवक्त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. भिवंडीतील पत्रकारांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण