
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंढरपूर शहरातील सरडा भवन येथे भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करून ती ११ गाढवांवर ११ टिक्की लादून, तर जुना अकलूज रोड जॅकवेल जवळील भीमा नदी पात्रामध्ये १८ गाढवांवर १८ टिक्की लादून, तसेच मांडव खडकीदेवीच्या मंदिराजवळ नदी पात्रातून ७ गाढवांवर वाळू वाहतूक करतांना पोलिसांना आढळले. या एकूण ३६ गाढवाना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले होते. या गाढवांच्या मालकांची माहिती पोलिसांना न मिळाल्याने अखेर या गाढवांची रवानगी तमिळनाडू राज्यातील उटी येथे करण्यात आली आहे.
अवैधरित्या वाळू उपसा करणार्या वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. या कारवाईपासून वाचण्यासाठी वाळू चोर वाळूची चोरी करण्यासाठी गाढवांचा वापर करतात. प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंडवाडा नाही. त्या गाढवांना चार दिवस चारा टाकण्याचे काम पोलीस कर्मचारी करत होते, तसेच गाढवे पळून जाऊ नयेत यासाठी २ होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून ३६ गाढवांना वाहनातून उटी येथे पाठवण्यात आले.
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !