रजत ओसवाल आणि डॉ. नम्रता सिंग मोहिमेच्या कालावधीत देणार सामाजिक संदेश

कोल्हापूर, १८ डिसेंबर – कोल्हापूर हे नेहमी आगळं-वेगळं काहीतरी करण्यासाठी ओळखले जाते. येथील रजत ओसवाल हे त्यांच्या स्वत: रिक्शातून बेंगळुरूच्या डॉ. नम्रता सिंग यांच्यासह संपूर्ण उत्तर भारताच्या मोहिमेवर जाणार आहेत. उत्तर भारत हा हिमालयाच्या पर्वतरांगांनी नटलेला आहे. आजपर्यंत सायकल किंवा बुलेट अशा विविध माध्यमांतून अनेकांनी साहसी प्रवास केलेला आहे; पण रिक्शातून प्रवास करणे ही पहिलीच घटना आहे. याचा प्रारंभ कोल्हापुरातील न्यू पॅलेस, कसबा बावडा येथून २० डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता होणार आहे, अशी माहिती रजत ओसवाल यांनी १८ डिसेंबर या दिवशी ‘प्रेसक्लब’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी रजत ओसवाल म्हणाले
१. ही ३० दिवसांची विशेष मोहीम असून यात पुणे-मुंबई-सूरत-वडोदरा-उदयपूर-अजमेर- जयपूर- आग्रा- नवी देहली- शिमला- मनाली- धर्मशाला- डलहौसी- अमृतसर- चंदीगढ- देहली- आग्रा- झाशी- भोपाळ- इंदूर- नाशिक- पुणे या मार्गांवरून ५ सहस्र किलोमीटरचा प्रवास होणार आहे.
२. या प्रवासाच्या कालावधीत ‘स्तनाचा कर्करोग’ आणि पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी ‘एक झाड लावा, एक झाड वाचवा’ या दोन समस्यांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
३. या मोहिमेसाठी सर्व साधनांनी युक्त अशी विशेष रिक्शा सिद्ध करण्यात आली असून यासाठी लागणार्या सर्व अनुमतीही घेण्यात आल्या आहेत.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan