शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्राधान्य देणार ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
सध्या शेतकर्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयुष्यातील यापुढील १० वर्षे मी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी येथे केली.