
सातारा, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – मनसेने सातारा येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये येऊन औरंगाबाद लिहिलेले फलक पालटून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लिहिलेले फलक लावले. त्यानंतरच एस्.टी. बसगाड्या आगाराबाहेर पाठवल्या.
मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, अधिवक्ता विकास पवार, शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना मनसेचे सातारा जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे म्हणाले की, पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर पक्ष नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने राज्यभरात नामांतरासाठी जनआंदोलन चालू केले आहे. मनसे याविषयी आक्रमक झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करू शकत नाहीत. आम्हीही नामांतर केल्याविना मागे सरकणार नाही.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !