लहानपणापासून देशभक्तीच्या विचारांत रमणारा आणि देशाला अत्युच्च स्थानी नेण्याचे ध्येय असलेला कु. जयेश !
एकदा जयेशने ‘केसरी’ हा चित्रपट पाहिला. त्यात मुख्य सैनिकाला लढतांना वीरमरण येते. तो चित्रपट पाहिल्यावर बर्याच वेळा तो मला म्हणायचा, ‘‘आई, मलाही असेच माझ्या मातृभूमीसाठी लढतांना वीरमरण आले, तर किती चांगले होईल !’’