नाशिक येथील मराठी साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला !

साहित्य संमेलन पंचतारांकित करण्याच्या नादात महामंडळाच्या धोरणाचा बळी दिला, असा आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केला आहे.

नाशिक येथे २५ मार्चपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलन !

मराठी भाषेच्या शुद्धीसाठी मुसलमान आक्रमकांकडून मराठीत आलेले उर्दू, तसेच फारसी, अरबी शब्द काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धी केली. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ही संकल्पनाच निरर्थक आहे !

साहित्यांतून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणी असतात ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

राजकारण, समाजकारण आणि तरुण पिढी यांना साहित्यिकांनी प्रभावित केले आहे. पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास आणि वारसा महत्त्वाचा असतो.

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य दालनाला भेट !

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सपत्नीक भेट देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथकक्षांमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांच्या साहित्याचे ग्रंथ खरेदी केले.

(म्हणे) ‘लेखक आणि साहित्यिक यांचे लेखनस्वातंत्र्य न्यून होत आहे !’

साहित्यप्रेमींना उपदेश करणार्‍या जावेद अख्तर यांनी ही गोष्ट प्रथम ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देणार्‍या स्वत:च्या समाजबांधवांना आणि कथित पुरोगाम्यांना सांगावी.

अन्न वाया घालवणार्‍यांना आकारण्यात आलेला दंड आणि त्यांचे केलेले प्रबोधन यांमुळे साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी टळली !

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आयोजकांनी केलेले नियोजन कौतुकास्पद आणि अनुकरणीय ! श्री. सतीश महाजनांच्या प्रयत्नांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा !

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर (जिल्हा लातूर) येथे होणार !

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे, अशी घोषणा साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धार्मिक ग्रंथांच्या खरेदीकडे वाचकांचा सर्वाधिक कल !

पुस्तकांचे एकूण २०५ विक्रीकक्ष उभारण्यात आले होते. त्यामध्ये ऐतिहासिक, वैज्ञानिक, बालसाहित्य आदी विविध ग्रंथ विक्रीसाठी होते. यामध्ये धार्मिक ग्रंथांच्या कक्षावर कायमच सर्वाधिक गर्दी होती.

मराठीला वाचवायचे असेल, तर आपण स्‍वत: मराठीत बोलायला हवे ! – नरेंद्र चपळगावर, निवृत्त न्‍यायमूर्ती

‘‘मराठीला ज्ञानभाषा करायची आहे, असे आपण म्‍हणतो; परंतु दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी मुले इंग्रजी शाळांकडे आकर्षित होत आहेत; कारण सरकार आणि पालक दोघेही मराठी शाळांना पाठिंबा देत नाहीत.

मराठी भाषेला वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी शासनाने प्रयत्न करावेत ! – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या समारोपाच्‍या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते उपस्‍थित होते. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्‍ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्‍हणाले.