एस्.टी. महामंडळाला ३ सप्टेंबरपर्यंत वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश !

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली, तरी प्रवाशांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे एस्.टी.ला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

९८ सहस्र एस्.टी.चे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत !

प्रति मासाच्या ७ दिनांकाला होणारे वेतन ऑगस्ट मासाचा १५ दिनांक उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे घराचा व्यय भागवण्याची मोठी समस्या कर्मचार्‍यांसमोर आहे.

नागपूर येथे ‘एस्.टी.’ महामंडळाकडून जिवंत निवृत्त कर्मचारी मृत घोषित !

‘एस्.टी.’ महामंडळाचा भोंगळ कारभार !

सातारा आगारात इंधनाचा तुटवडा !

दळणवळण बंदीमुळे अनेक मार्गांवरून बसेस मोकळ्याच धावत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगारांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे.

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.

‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाचे चित्र बसच्या आतील बाजूने लावण्यात यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

श्री विठ्ठलाची विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

गणेशोत्‍सवानिमित्त कोकणात जाण्‍यासाठी मुंबई येथून २ सहस्र २०० जादा ‘एस्.टी.’ गाड्यांची सोय !

१० सप्‍टेंबरपासून चालू होणार्‍या गणेशोत्‍सवानिमित्त महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्‍यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्‍य परिवहन महामंडळाने दिली.

एस्.टी. कर्मचार्‍यांचे रजेचे वेतन आणि एकतर्फी वेतनवाढीचा फरक देणे प्रलंबित ! 

यासाठी महाराष्ट्र एस्.टी. कामगार संघटनेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष अन् व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने, तसेच वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी मंदार पोहोरे यांची भेट घेऊन मागणी केली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वारसांना ५० लाख आर्थिक साहाय्य द्या ! – अनिल परब, परिवहन मंत्री

कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

इंधनाअभावी एस्.टी.चा वेग मंदावला

इंधनासाठी पैसे पाठवू न शकल्यामुळे जिल्ह्यांतील सर्वच आगारातील डिझेल संपले आहे. परिणामी इंधनाअभावी जिल्ह्यातील एस्.टी.बसगाड्यांचा वेग मंदावला आहे.