राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली !

सांगली बसस्थानकासमोर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वहातांना भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते

सांगली, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या तसेच अन्य विविध कारणांमुळे ‘एस्.टी.’च्या (राज्य परिवहनाच्या) ३१ कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. या कर्मचार्‍यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगली बसस्थानकासमोर श्रद्धांजली वहाण्यात आली. ‘या कर्मचार्‍यांच्या आत्महत्येला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे’, असा आरोप माजी आमदार नितीन शिंदे यांनी याप्रसंगी केला. या वेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, पृथ्वीराज पवार, अविनाश मोहिते, दीपक शिंदे, विनायक सिंहासने यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.