कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा ! – महाविकास आघाडीच्या आमदारांची मागणी

विरोधी पक्षनेते अजित पवार अन् विधान परिषदेत अनिल परब यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भूमी घोटाळ्याचे आरोप ! ‘या प्रकरणी सत्तार यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी महाविकास आघाडीने करून विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

आयटीआय विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन लागू करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता

आयटीआय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढीसंदर्भात तारांकित प्रश्नात सदस्य विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली.

वीजमीटरचे चुकीचे रिडिंग देणार्‍या ७९ एजन्सींवर शासनाकडून कारवाई ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात महावितरण आस्थापनाकडून अधिक वीजदेयके आकारण्यात येत असल्याचा सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर फडणवीस यांनी ही माहिती दिली.

सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ नामांतर करण्यास संमती !

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास २६ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत संमती देण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याविषयी शासकीय ठराव मांडला होता.

खुलताबाद (जिल्हा संभाजीनगर) येथे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ला मान्यता !

खुलताबाद शहरालगतच असलेल्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ आणि सुलिभंजन ही पर्यटन अन् धार्मिक स्थळेही आहेत.

देवगिरी सहकारी साखर कारखानाच्या जागेतील गौण खनिजाच्या उत्खननाची विभागीय चौकशी होणार !

संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ८०-१०० एकर भूमीतील लाखो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तो समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आला; मात्र अद्याप त्याचे पैसे कारखान्याला मिळालेले नाहीत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तसूभरही भागे हटणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोणत्याही परिस्थितीत आम्ही सीमाबांधवांना वार्‍यावर सोडणार नाही. महाराष्ट्राच्या इंच-इंच जागेसाठी लढू. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आम्ही तसूभरही भागे हटणार नाही, अशी राज्यशासनाची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मांडली.

गायरान भूमी घोटाळा आणि कृषी महोत्सवासाठी अधिकार्‍यांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप !

अधिकाराचा गैरवापर करून गायरान भूमी एका व्यक्तीला दिल्याप्रकरणी, तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी अयोग्य पद्धतीने पैसे वसूल केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, यासाठी २६ डिसेंबर या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.

जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे न घेतल्याने विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग !

जयंत पाटील यांनी अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. स्वत:च्या नेत्यांच्या चुकीच्या वर्तनासाठी सभात्याग करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांनी वेळ देणे अपेक्षित आहे !

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा ! – उद्धव ठाकरे

सीमावादाच्या सूत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.