४ दिवसांनंतर पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अवजड आणि अत्यावश्यक वाहतुकीसाठी चालू : सांगलीत संथगतीने पुराला उतार
यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत.
यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अजित पवार यांना पूर परिस्थितीची माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी ‘ड्रोनद्वारे’ही पुराची पहाणी केली.
सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहा:कार उडाला असून जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये ३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ५ सहस्र ६५६ नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे.
पूरस्थितीमुळे राज्यातील १ सहस्र २८ गावे बाधित झाली असून आतापर्यंत १६४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूरग्रस्त भागातून २ लाख २९ सहस्र ७४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून अद्याप १०० लोक बेपत्ता आहेत.
कोयना धरणातून पाणी न्यून सोडले; मात्र धरणाच्या बाहेर पुष्कळ प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा विशेष परिणाम झाला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित !
अंकली, जुनी धामणी, हरिपूर येथील नागरिकांसाठी मालू हायस्कूल, विलिंग्डन कॉलेज याठिकाणी स्थलांतरीत करून ३०० हून अधिक पूरग्रस्तांसाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे.
पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील पुलावरून पाणी वहात असल्याने काही काळासाठी संपर्क तुटला होता. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.
कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
व्यापारी आणि नागरिक यांची कोट्यवधी रुपयांची हानी