देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !

देहू (जिल्हा पुणे) – आषाढी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पायी चालत असतात. या प्रवासात दुर्दैवाने एखाद्या वारकर्‍याचा अपघाती मृत्यू झाला किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या अनपेक्षित कारणामुळे निधन झाले, तर त्या वारकर्‍याच्या कुटुंबाला श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने १ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून आणि वारकरी कुटुंबाप्रती असलेल्या आपुलकीतून उचललेले एक छोटेसे पाऊल आहे. या आर्थिक साहाय्यासाठी संस्थानने निश्चित केलेले नियम आणि अटी लागू रहातील, असे संस्थानच्या वतीने कळवण्यात आले आहे.