धर्मांध मुसलमानांचा कावेबाजपणा जाणा !

जागा नसल्याने कुणी १० मिनिटे मशिदीबाहेर नमाजपठण करत असेल, तर तुम्हाला अडचण आहे; पण कावड यात्रेच्या काळात रस्ते महिनाभर बंद असतात. याने तुम्हाला त्रास होत नाही का ?, असे संतापजनक विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.

हिंदुद्वेषी कॉन्व्हेंट शाळांवर कारवाई हवी !

गुना (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील ‘वंदना कॉन्व्हेंट स्कूल’मध्ये विद्यार्थी संमेलनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोकाचे पठण केल्याने मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन यांनी त्यांना विरोध केला.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !

मंदिर चालवणे, हे सरकारचे काम नाही. सरकार केवळ व्यवस्थापन पाहू शकते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी
मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे, असा युक्तीवाद भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.

काश्मीरमधील आतंकवाद नष्ट न होण्याचे कारण जाणा !

आतंकवाद्यांसाठी शस्त्रास्त्रे आणि पैसे गोळा करणे, तसेच पाकिस्तानी तस्करांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अमली पदार्थांचे वितरण करणार्‍या इम्तियाज लोन, बाजील मीर, मुश्ताक पीर आणि जैद शाह या ४ सरकारी कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

बांगलादेशमध्ये आरक्षणावरून गेले काही दिवस झालेल्या हिंसाचाराच्या माध्यमातून हिंदूंची घरे जाळण्यात आल्याचे दाखवणारे व्हिडिओ प्रसारित झाले. आंदोलक ‘ज्यांच्या मामाचे घर भारत आहे, त्यांनी लवकर बांगलादेश सोडावे’, असे म्हणत होते.

काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा ! 

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मंगळुरूमधील शाळांच्या मैदानांचा वापर अशैक्षणिक कारणांसाठी न करण्याचा आदेश दिल्यानंतर शाळा व्यवस्थापन मंडळाने गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसाठी शाळांची मैदाने देण्यास नकार दिला आहे.

भारत पाकला असे प्रत्युत्तर कधी देणार ?

येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अविव शहरावर केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलने येमेनमधील हुती बंडखोरांच्या स्थानांवर हवाई आक्रमणे केली. यात ३ हुती बंडखोर ठार, तर ८७ जण घायाळ झाले आहेत.

देशात धर्मांध उद्दाम, तर हिंदू असुरक्षित !

दिंद्रुड (बीड) येथे मेहबूब सुभान दर्ग्याच्या परिसरातील झाडाला लागलेली जांभळे तोडून खाणार्‍या ३ विद्यार्थ्यांना मौलवी मुजीब शेख आणि त्याचा साथीदार समीर अत्तार कासम यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका हिंदु विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

संपूर्ण देशात दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याचा कायदा करा !

प्रशासनाच्या आदेशानंतर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दुकानदार, तसेच फळविक्रेते यांनी दुकाने आणि हातगाड्या यांच्यावर स्वतःची नावे लिहिण्यास प्रारंभ केला आहे.

देशात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांत मोहरमच्या मिरवणुकींत पॅलेस्टिनी झेंडे फडकावले जाण्यासह दगडफेक, मारामारी आणि लुटमार झाल्याचे समोर आले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला.