साधकांनो, ‘सनातनच्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्याप्रमाणे भक्तीसत्संगांचा लाभ आपण घेतो का ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करा !

गेल्या ५ वर्षांपासून साधकांसाठी ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संगांचे आयोजन करण्यात येत आहे. सत्संगाचा प्रवास आता भावाकडून भक्तीकडे झाल्याने आता या सत्संगाचे नामकरण ‘भक्तीसत्संग’ असे केले आहे.

तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही वडिलांच्या निधनाच्या प्रसंगी स्थिर राहून साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या पुणे येथील सुगम संगीत विशारद कु. मधुरा चतुर्भुज !

पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज यांचे निधन झाले. त्यांची कन्या कु. मधुरा चतुर्भुज हिला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरीही वडिलांच्या निधनाच्या कठीण प्रसंगाला ती स्थिरतेने आणि धैर्याने सामोरे गेली. त्या वेळी तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि तिच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सतत व्यस्त असूनही व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७३ वर्षे) !

एवढ्या व्यस्ततेतही त्या त्यांची व्यष्टी साधनाही तेवढ्याच गांभीर्याने करतात. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा ठरलेल्या आहेत. कुणी प्रार्थना करायला विसरले, तर पू. माई त्यांना ‘प्रार्थनेची वेळ झाली. चला या. प्रार्थना करूया’, असे सांगून प्रार्थनेची आठवण करून देतात.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा करतांना तिथे आनंद आणि चैतन्य जाणवणे अन् सेवा संपल्यावर तिथे ‘राम’ हा शब्द उमटणे

‘माझे प.पू. दास महाराज यांच्याकडे येणे-जाणे आहे. मी लग्न होऊन सावंतवाडी येथे आले, तेव्हा माझी प.पू. दास महाराज यांच्याशी प्रथम भेट झाली. प्रथम भेटीतच त्यांनी माझ्यावर पुष्कळ प्रीतीचा वर्षाव केला. तो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

सात्त्विक गोष्टींची आवड असलेली येथील चि. अवनी अमित चिमलगी (वय १ वर्ष) हिच्या पहिल्या वाढदिवसाला तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

चि. अवनीची आई सौ. रश्मी चिमलगी यांना तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या  (कै.) श्रीमती प्रभा कानस्कर (वय ७९ वर्षे) !

९.१२.२०२१ या दिवशी कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर देवाज्ञा झाली. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

‘कोव्हिशिल्ड’ लसीचा परिणाम ३ मासांत अल्प होऊ लागत असल्याने ‘बूस्टर डोस’ आवश्यक ! – संशोधक

भारतात बहुतांश लोकांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतली आहे. त्यामुळे हा अहवाल भारतियांसाठी चिंता वाढवणारा आहे.

पाकमधून ७ सहस्र नागरिकांचा भारताची नागरिकता मिळण्यासाठी अर्ज ! – केंद्र सरकारची माहिती

वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताची नागरिकता देण्यात आली, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळ्याच्या प्रकरणी विधान परिषदेत विरोधक आक्रमक !

‘आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेत ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या नैतिकतेला धरून नाहीत. यामध्ये पालट करणे आवश्यक आहे. ही परिस्थिती कलियुग असल्याचे द्योतक आहे. कुंपणच शेत खात आहे’, हे आरोग्यमंत्र्यांनी मान्य केले.

सुवर्ण मंदिरातील जमावाकडून ठार झालेल्या व्यक्तीला ‘हिंदु आतंकवादी’ ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

ब्रिटनमधील महिला शीख खासदार प्रीतकौर गिल यांचा हिंदुदेष !
लोकांच्या विरोधानंतर ट्वीट हटवले !