‘पू. माईंकडून (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्याकडून) शिकण्यासारखे पुष्कळ आहे. त्या म्हणजे दैवी गुणांचा खजिनाच आहेत.

१. सर्वांचे आदरातिथ्य प्रेमाने करणे
पू. माईंकडे सतत साधक आणि त्यांचे नातेवाईक यांचे येणे-जाणे चालू असते. त्यामुळे त्या सतत व्यस्त असतात; पण तरीही पू. माईंचे सर्वांकडे अगदी बारीक लक्ष असते. ‘चहा-पाणी, अल्पाहार आणि जेवण घेतले ना ?’, असे त्या प्रत्येकाला विचारतात.
२. इतरांना प्रार्थनेची आठवण करून देणे
एवढ्या व्यस्ततेतही त्या त्यांची व्यष्टी साधनाही तेवढ्याच गांभीर्याने करतात. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा ठरलेल्या आहेत. कुणी प्रार्थना करायला विसरले, तर पू. माई त्यांना ‘प्रार्थनेची वेळ झाली. चला या. प्रार्थना करूया’, असे सांगून प्रार्थनेची आठवण करून देतात.
३. व्यष्टी साधना पूर्ण करूनच झोपणे
पू. माई रात्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचे वाचन करतात. सर्व जण झोपल्यानंतर पू. माई नामजप किंवा वाचन हे सर्व पूर्ण करूनच झोपतात आणि तरीही त्या सकाळी सर्वांच्या आधी उठतात.’
– सौ. मांडवी भरत बुगडे, नवीन पनवेल (१८.१२.२०२१)
(‘प.पू. दास महाराज यांचे खडतर बालपण आणि प.पू. भगवानदास महाराज अन् पू. रुक्मिणीमाता या विरागी दांपत्याने त्यांचा केलेला सांभाळ !’ या लेखाचा क्रमशः भाग आज जागेअभावी प्रसिद्ध करू शकलो नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी. – संपादक)
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी समर्पित जीवन जगणारे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्त्व – मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (वय ६० वर्षे) !
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !