
१. प्रथम भेटीतच प्रीतीचा वर्षाव करणारे प.पू. दास महाराज !
‘माझे प.पू. दास महाराज यांच्याकडे जवळ जवळ १७ – १८ वर्षे येणे-जाणे आहे. मी लग्न होऊन सावंतवाडी येथे (जिल्हा सिंधुदुर्ग) आले, तेव्हा माझी प.पू. दास महाराज यांच्याशी प्रथम भेट झाली. प्रथम भेटीतच त्यांनी माझ्यावर पुष्कळ प्रीतीचा वर्षाव केला. तो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

२. सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा चालू असतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होणे आणि गुरुस्मरण करत ही सेवा केल्यावर तिथे उमटलेला ‘राम’ हा शब्द पाहून भावजागृती होणे
सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा करत असतांना मला पुष्कळ आनंद आणि वातावरणात चैतन्य जाणवत होते. येथे बाहेर पुष्कळ शेवाळे आले होते. मी ते स्वच्छ करतांना ‘जो जाण्या-येण्याच्या वाटेवरचा भाग आहे, तेथील शेवाळे आधी घासून काढूया’, असा विचार करून मी तिथून घासायला चालू केले. तेव्हा आपोआपच माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू झाला. ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले होते, ‘आपण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू, तेव्हा आपण आपल्या गुरुदेवांचे स्मरण करत आहोत’, असा भाव ठेवावा. तसा नामजप करत मी ते शेवाळे खरवडून काढतांना ते सहजतेने खरवडले गेले. संध्याकाळ झाल्यावर आम्ही ती सेवा थांबवली. तेव्हा त्या जागेवर ‘राम’ हा शब्द उमटला होता. मी हे पाहिल्यावर माझे मन पुष्कळ कृतज्ञतेने भरून आले. ‘येथे रामतत्त्व भरून राहिले आहे. गुरुदेवच येथे आहेत’, अशीही मला जाणीव होत आहे.’
– सौ. मांडवी भरत बुगडे, नवीन पनवेल (१८.१२.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी समर्पित जीवन जगणारे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्त्व – मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर (वय ६० वर्षे) !
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे