अधिक किंवा ‘पुरुषोत्तम मासा’चे महत्त्व, या काळात करावयाची व्रते आणि पुण्यकारक कृती अन् ती करण्यामागील शास्त्र !

या वर्षी १८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक आश्‍विन मास’ आहे. अधिक मासाला पुढच्या मासाचे नाव देतात, उदा. आश्‍विन मासापूर्वी येणार्‍या अधिक मासाला ‘आश्‍विन अधिक मास’ असे संबोधतात आणि नंतर येणार्‍या मासाला ‘निज आश्‍विन मास’ म्हणतात.

अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

१८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात ‘अधिक मास’ आहे. या मासात दान केल्यास त्याचे अधिक पटींनी फळ मिळते. सनातनची बहुविध आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे चिरंतन ज्ञानाचा अनमोल ठेवा ! त्यामुळे अधिक मासात अशा ग्रंथदानाद्वारे ज्ञानदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्यावा.

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

यावर्षी २ ते १७ सप्टेंबर २०२० हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .

हिंदूंंनो, पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र जाणून घेऊन तशी कृती करा !

‘२३.९.२०१४ ला एस्.एस्.आर.एफ्.चे ऑस्ट्रेलिया येथील साधक श्री. शॉन क्लार्क यांनी त्यांच्या पितरांना गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी केला होता.

पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते.

सनातनचे ‘बालसंत’ पू. वामन राजंदेकर यांचे ‘जावळ’ काढल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात पुष्कळ वाढ होणे आणि जावळ काढण्यासाठी वापरलेल्या वस्तू चैतन्याने भारित होणे

५.३.२०२० या दिवशी सनातनचे ‘दुसरे बालसंत’ पू. वामन राजंदेकर यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘जावळ’ काढण्यात आले. या संस्काराचा त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. त्याचे विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .