‘घर घर तिथे शिवसेना सभासद नोंदणी’स गांधीनगर येथून प्रारंभ !

या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेल्या घडामोडींविषयी व्यापारी वर्गाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.’’ 

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन !

अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ?

मत्तीवडे (जिल्हा कोल्हापूर) येथील गणेशोत्सव मंडळांचा ‘हिंदु राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे सर्वश्री शशांक सोनवणे आणि आदित्य शास्त्री यांनी आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी प्रबोधन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ मोहीम

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’, ही मोहीम सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन, शाळा, महाविद्यालये, इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालय येथे याविषयीचे निवेदन देण्यात आले.

स्थानांतरासाठी आंदोलन करणार्‍या काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे वेतन बंद !

सरकारने काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करून हिंदूंसाठी भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास हिंदूंना असे आंदोलन करावे लागणार नाही ! सरकारने त्यासाठी पावले उचलावीत !

श्रीलंकेकडून पाकच्या युद्धनौकेला त्याच्या बंदरावर मुक्काम करण्याची अनुमती

श्रीलंकेची स्थिती अत्यंत दयनीय असतांना भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत असूनही त्याची भारतविरोधी मानसिकता अद्याप नष्ट झालेली नाही, हेच या घटनेतून दिसून येते ! भारताने याविषयी श्रीलंकेला जाब विचारला पाहिजे आणि त्याला देण्यात येणारे साहाय्य बंद केले पाहिजे !

देशातील निवडक नागरिकांनाच राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची माहिती असणे, हे दुर्दैवी ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

लोकांना ‘राज्यघटना काय म्हणते ? आणि कायद्यांतर्गत कसे अधिकार आहेत ?, ते वापरायचे कसे ?’, याची माहिती नाही. आपली कर्तव्ये काय आहेत ?, हेही ठाऊक नाही, हे दुर्दैवी आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी व्यक्त केले.

राजधानी देहलीत पुन्हा ‘मास्क’ची सक्ती !

राजधानीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी केजरीवाल सरकारने पुन्हा मुखपट्टी वापरणे (मास्क वापरणे) सक्तीचे केले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील २९ सहस्र ४०१ पदे रिक्त !

पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो आणि कामेही प्रलंबित रहातात. राज्यातील गुन्ह्यांची संख्या पहाता पोलीस दलातील पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.

मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना मानाचे स्थान ! – न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

एका न्यायमूर्तीपदावरील महिलेने ‘मनुस्मृतीमध्ये महिलेला आदराचे स्थान दिले आहे’, असे सांगितल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या स्त्रमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबणे साहजिक आहे !