याला स्वातंत्र्यानंतरचे सर्व शासनकर्ते उत्तरदायी आहेत !

नवी देहली – आपण आता स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहोत; परंतु तरीही शहरी भागातील काही निवडक लोक किंवा कायदेशीर व्यावसायिक यांनाच घटनात्मक अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव आहे. लोकांना ‘राज्यघटना काय म्हणते ? आणि कायद्यांतर्गत कसे अधिकार आहेत ?, ते वापरायचे कसे ?’, याची माहिती नाही. आपली कर्तव्ये काय आहेत ?, हेही ठाऊक नाही, हे दुर्दैवी आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी व्यक्त केले. ते ‘ईस्टर्न बुक आस्थापना’च्या ‘सुप्रीम कोर्ट केस प्री-१९६९’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी बोलत होते.
CJI Ramana Stresses On Need For Simple Judgments And Accurate Legal Reporting @padmaaa_shr https://t.co/MMjN6ApKRs
— Live Law (@LiveLawIndia) August 11, 2022
सरन्यायाधीश रमणा पुढे म्हणाले की, पाश्चात्त्य देशात एका लहान शाळकरी मुलगाही तेथील राज्यघटना आणि कायदे यांविषयी जागरूक असतो. ही संस्कृती आपल्याकडे असायला हवी. अधिवक्ता आणि जनता यांना घटनात्मक तरतुदी आणि राज्यघटना ठाऊक असणे आवश्यक आहे.
कॉकरोच जनता पक्ष परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली यंत्रणा ! – RSS Leader Indresh Kumar
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !