प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाची पुन्हा लक्षवेध आंदोलनाची चेतावणी !

महासंघाच्या वतीने २७ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश !

एका महिलेला विमानतळावर पोचण्यास विलंब झाल्याने उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश मुंबईतील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

जांबसमर्थ (जालना) येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या देवघरातील मूर्ती चोरणार्‍या २ धर्मांध मुसलमानांना अटक !

शेख हुसेनला अटक करून त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेने ४ मूर्ती कह्यात घेतल्या. मुख्य आरोपी शेख जिलानी हा अद्याप पसार आहे. मूर्तीचोर आणि विकत घेणारा अशा दोघांना पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अंनिसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड !

इस्लाममध्ये असलेल्या अंधश्रद्धा नसिरूद्दीन शाह यांना ठाऊक आहेत, तर त्या विरोधात ते आणि अंनिसवाले एकत्रित लढा का देत नाहीत ? केवळ हिंदूंच्या सण-उत्सव यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या अंनिसवाल्यांचा हिंदुविरोधी मुखवटा उघड होतो !

आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढणे आवश्यक ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

२६/११ या दिवशी मुंबईवर झालेले आतंकवादी आक्रमण कुणीही विसरू शकत नाही. हा आमच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. याच ठिकाणी आतंकवादाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होत आहे. आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी सक्षम आहेत.

दिवाळीनिमित्त कोपर्डी हवेली (तालुका कराड) येथे प्रवचन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दिवाळी सणाचे महत्त्व’ तसेच ‘हलालमुक्त दिवाळी कशा पद्धतीने साजरी करावी ?’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ४० युवक-युवती ग्रामस्थ उपस्थित होते.

मुंबईवरील ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणाचे मुख्य कारस्थानी अद्यापही सुरक्षित !

मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे सडेतोड प्रतिपादन !

राज्यातील रेल्वेस्थानकांवरील कोट्यवधी रुपयांची शेकडो ‘वॉटर वेंडिंग मशिन’ बंद !

बहुसंख्य फलाटांवरील यंत्रे बंद पडली आहेत, याचा अर्थ ‘ही यंत्रे बंद पडली आहेत कि बंद पाडली गेली आहेत ?’, याविषयीचा संशय बळावतो. रेल्वेफलाटावरील पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या दुकानदारांचा यामागे हात आहे का ? याचाही शोध प्रशासनाने घ्यायला हवा !

खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भाडेवाढीविरोधात परिवहन अधिकार्‍यांची ‘नागरिकांनी तक्रार करावी’, अशी अपेक्षा !

असे असले, तरी ज्या गोष्टी प्रशासनाला ठाऊक आहेत, त्याविषयी प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?