हिंदु धर्मावरील आघात थांबत नाहीत, तोपर्यंत हिंदू राष्ट्र सेना कार्यरत रहाणार ! 

हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची सोलापूर येथे पत्रकार परिषद

भ्रष्टाचाराची चौकशी सरकारी अधिकार्‍यांकडून परस्पर बंद !

भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देवनिधी लुटणारे महापापीच होत. अशांना शिक्षा न करणे, हा एक प्रकारे धर्मद्रोहच आहे ! भ्रष्टाचार्‍यांसह त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्वांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

लव्ह जिहादच्या घटनेचा निषेध करण्यासाठी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे आज बंद !

हिंदु जनजागृती मंच, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, जैन समाज आदींचा या बंदला पाठिंबा आहे. सकल हिंदु समाजाच्या वतीने हे बंदचे आवाहन लव्ह जिहाद, धर्मांतर आदींचा निषेध करण्यासाठी करण्यात आले आहे.

चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

चॉकलेट घशात अडकल्याने कोडोली परिसरातील शर्वरी सुधीर जाधव या १ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. शर्वरीला एका मुलीने जेलीचे चॉकलेट खाण्यास दिले. तिने चॉकलेट खाल्ल्यानंतर ती खोकू लागली. नंतर ती बेशुद्ध पडली.

सातारा जिल्हा रुग्णालयात २ गटांमध्ये तुंबळ हाणामारी !

येथील जिल्हा रुग्णालयात २५ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता २ गटांत तुंबळ हाणामारी झाली. २७ क्रमांकाच्या खोलीत उपचार घेणार्‍या २ रुग्णांना बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत ५-६ जण गंभीर घायाळ झाले आहेत.

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाऐवजी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी जैन समाजाचा इचलकरंजी (कोल्हापूर) येथे मोर्चा !

झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रहित करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जैन समाजाने २६ डिसेंबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवेदन स्वीकारले.

सीमाभागातील बांधवांसमवेत सरकार ठामपणे उभे असल्याच्या ठरावाला पाठिंबा ! – उद्धव ठाकरे

कर्नाटक सरकारने ‘एक इंचही भूमी आम्ही महाराष्ट्राला देणार नाही’, असा ठराव केल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक, माता-भगिनी आणि बांधव आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा ठराव केला.

गोवंशियांची अनधिकृत वाहतूक : आरोपीला न्यायालयीन कोठडी

गोवंशियांची वारंवार होणारी अवैध वाहतूक, हा संबंधित आरोपींवर ठोस कारवाई न केल्याचा परिणाम !

गोतस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी !

मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्‍यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे.

सिंधुदुर्गामध्ये आर्.टी.ओ. कार्यालयाचा भ्रष्ट कारभार, ११६ वाहनांची बोगस नोंदणी !

भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्ट अधिकार्‍यांवर केवळ ६ मासांकरता निलंबनाची कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी निलंबित करून कायदेशीवर कारवाई व्हायला हवी. यासाठी कायद्यात आवश्यक पालट करावा.