
नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ११६ वाहनांची बोगस नोंदणी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या वाहनांचे शुल्क आणि कर यांचा २० कोटी रुपयांचा निधी शासनाकडे जमा झाला नसल्याची गंभीर गोष्ट मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. कुडाळमधील आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली ? याविषयीचा तारांकित प्रश्न २७ डिसेंबर या दिवशी सभागृहात उपस्थित केला होता.

वर्ष २०१७ ते २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी खासगी आस्थापनातील ३ जणांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला असून उपप्रादेशिक परिवहन विभागातील ५ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. यावर भास्कर जाधव यांनी ही सर्व वाहने रस्त्यांवर फिरत असल्याची माहिती दिली. त्यावर मंत्री देसाई यांनी वाहनांची नोंदणी रहित करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले. निलंबित कर्मचार्यांना शासन नियमाप्रमाणे ६ मासांनी कामावर पुन्हा घेण्यात आले असून अकार्यकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. (भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्ट अधिकार्यांवर केवळ ६ मासांकरता निलंबनाची कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी निलंबित करून कायदेशीवर कारवाई व्हायला हवी. यासाठी कायद्यात आवश्यक पालट करावा. – संपादक)
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी