काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांची विधानसभेत मागणी

रावेर (जिल्हा जळगाव) – मध्यप्रदेश येथून रावेरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधपणे गोवंशीयांची वाहतूक चालू आहे. अनेक वेळा गोतस्करी करणार्यांची वाहने पकडली जातात; मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे गोवंशीयांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे. याविषयी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे. या वेळी आमदार चौधरी यांनी रावेर तालुक्यातील पालमार्गे काही मासांपूर्वी सुकी नदीमध्ये फेकलेल्या २३ मृत गोवंशीयांचा संदर्भ देत यातील गोतस्करांवर कठोर कावाई करण्याचीही मागणी केली.
जळगाव येथे २६ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत मुख्य वक्ते असलेले ‘सुदर्शन न्युज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी रावेर येथील गोतस्करी आणि गोरक्षकांवरील आक्रमणे यांविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन