हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची सोलापूर येथे पत्रकार परिषद

सोलापूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंना केवळ अनुकूल राजसत्ता मिळाल्यामुळे भारतीय संस्कृतीचे पुनर्वैभव प्राप्त होणार नाही. त्यामुळे ‘सीएए’सारख्या कायद्याला विरोध, हिंदु संतांवरील आक्रमणे, ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात थांबत नाहीत, तोपर्यंत हिंदू राष्ट्र सेना हिंदुत्वासाठी अखंड कार्यरत राहील, असे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांनी केले. येथील दत्तनगर भागात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. धनंजय देसाई पुढे म्हणाले की, विरोधी पक्ष त्यांचा राजकीय पराभव स्वीकारू शकले नाहीत; म्हणून विनाकारण महापुरुषांविषयी संभ्रम पसरवत आहेत, त्यांचे राजकीय अजेंडे हिंदूंनी राबवू नयेत. भारताची फाळणी झाली तेव्हाच हिंदूंसाठी हिंदुस्थान बनवला गेला; मात्र आज देशातील मुसलमान भारताला ‘दार-उल-इस्लाम’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !