
मुंबई – राज्यशासनाने वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास एकूण प्रकल्पाच्या २६ टक्के सहभाग देण्याकरता ३ सहस्र ४० कोटी रुपये संमत केला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे ‘सॅटेलाइट पोर्ट’ म्हणून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येणार आहे. हे देशातील सर्वांत मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण व्यय ७६ सहस्र २२० कोटी रुपये इतका आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून ‘मे वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड’द्वारे हे बंदर विकसित करण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण एकूण प्रकल्पाच्या ७४ टक्के, तर महाराष्ट्र सागरी मंडळ २६ टक्के व्यय करणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने याआधी महाराष्ट्र सागरी मंडळाला या बंदर उभारणीसाठी २६ टक्के रक्कम म्हणून ३ सहस्र ४० कोटी रुपये निधी दिला आहे.
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !