आयुष्य म्हणजे शरिराची मनाशी आणि मनाची शरिराशी स्पर्धा !

‘आयुष्य म्हटले की, डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे लगेच पुढील चित्र उभे रहाते. सकाळी उठण्यासाठी गजर (अलार्म) लावून झोपणे, वेळेवर (टायमिंगची) रेल्वे मिळवण्यासाठी धावपळ करणे, रेल्वेमधील गर्दी आणि त्यांच्या आपल्या मनात चाललेल्या विविधरंगी गप्पा, नोकरीला गेल्यावर वरिष्ठ अन् सहकारी यांच्याशी चालू असलेली स्पर्धा, भूक नसली, जेवणे, संध्याकाळी उद्याच्या कामाचे नियोजन करत परतीचा प्रवास करणे, घरी गेल्यावर घरातील तणाव, अशी स्थिती दिवसभर उणे-अधिक प्रमाणात सर्वांचीच असते. खरच सांगा, याला जीवन म्हणतात का ? समाजात रहायचे, तर समाजाप्रमाणे वाटचाल केली पाहिजे; पण हे सर्व आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती स्वस्थ ठेवून केले पाहिजे, नाहीतर एकापेक्षा एक भयावह राक्षस मागे लागतील.

मनःशांती उपचारपद्धत (मानस व्याधींसाठी)

शारीरिक आणि मानसिक ताणाला शांत करण्यासाठी आयुर्वेदामध्ये शिरोधारा, शिरोभ्यंग अन् पादाभ्यंग सांगितले आहे.

१. सर्वांग स्वेदन : औषधी काढ्याने सर्वांगास पेटीत (वेष्टित) झोपवून वाफ देणे आणि घाम काढणे

 

२. सर्वांग स्वेदन : औषधी काढ्याने सर्वांगास पेटीत (वेष्टित) झोपवून वाफ देणे आणि घाम काढणे

३. पादाभ्यंग : काश्याच्या (कांस्य या धातूपासून बनवलेली वाटी) वाटीने दोन्ही पायाचे तळवे घासून घेणे

४. शिरोभ्यंग : औषधी सिद्ध तेलाने डोक्यास हलक्या हाताने मसाज करणे

५. शिरोधारा : औषधी सिद्ध तेल, दूध, काढा आणि ताक इत्यादींने दोन्ही भुवयांमध्ये आज्ञाचक्रावर सतत धार धरणे

शिरोधारेने निद्रानाश, उच्च रक्तदाब, पोटाचे विकार, त्वचा विकार, मानसिक तणाव आणि शारीरिक दुर्बलता असे काही आजार बरे करता येतात.


अयोग्य जीवनशैलीमुळे मनुष्याच्या पाठी लागणारे राक्षसरूपी विकार

अ. निद्रानाश

आ. अपचन

इ. हृदयासंबंधी तक्रारी

ई. पक्षाघात

उ. उच्च रक्तदाब

ऊ. मधुमेह

ए. स्थौल्य

ऐ. डोकेदुखी

ओ. कर्करोग

औ. मानसविकार


योगाभ्यास करण्याचे महत्त्व

१. दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, ॐ कार, भ्रामरी यांसारखे प्राणायाम फुफ्फुसाचे प्राणवायू वहन करण्याची क्षमता वाढवतात.

२. शित्त्तली शित्तकारी हे प्राणायामाचे प्रकार शरिरातील उष्णता न्यून करतात.

३. भ्रस्तिका, कपालभाती हे प्राणायामाचे प्रकार शरिरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास साहाय्य करतात.

वरील सर्व प्राणायाम आपल्या दैनंदिन जीवनात पुष्कळ मोलाचे ठरतात. शरीर आणि मन यांचा लपंडाव कायमचा दूर करायचा असेल, तर योगशास्त्राचे नित्य नियमाने आचरण करावे. ‘पतंजलि’ योगशास्त्रात शरीर आणि मन यांची घडी घट्ट बसवायची असल्यास श्वासाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. या श्वासावर कार्य करणारे शास्त्र म्हणजे योगशास्त्र.’

– डॉ. दीपक केसरकर (साभार : ‘श्री गजानन आशिष’, मे २०१९)