या फुलांमुळे विषबाधा होत असल्याने बंदी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील त्रावणकोर देवस्वम बोर्ड (टीडीबी) आणि मलबार देवस्वम बोर्ड यांनी मंदिरांना प्रसादासाठी ‘ऑलिंडर’ फुलांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या फुलांच्या विषारी स्वरूपाबद्दल चिंता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या फुलांमुळे मानव आणि प्राणी यांना दुखापत होऊ शकते, असे मंडळाने म्हटले आहे.
१. त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष पी.एस्. प्रशांत यांनी पत्रकारांना सांगितले की, देवाला अर्पण केलेल्या वस्तू आणि मंदिरांमध्ये प्रसादात ऑलिंडरच्या फुलांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी तुळशी, थेची (इक्सोरा), चमेली आणि गुलाब यांसारखी इतर फुले वापरली जातील.
२. अलाप्पुझा आणि पठाणमथिट्टा येथे झालेल्या अनेक घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अलाप्पुझा येथील एका महिलेचा नुकताच ऑलिंडरची फुले आणि पाने खाल्ल्याने मृत्यू झाला. पाथनमथिट्टा येथे ऑलिंडरची पाने खाल्ल्याने गाय आणि वासरू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !