या फुलांमुळे विषबाधा होत असल्याने बंदी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील त्रावणकोर देवस्वम बोर्ड (टीडीबी) आणि मलबार देवस्वम बोर्ड यांनी मंदिरांना प्रसादासाठी ‘ऑलिंडर’ फुलांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या फुलांच्या विषारी स्वरूपाबद्दल चिंता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या फुलांमुळे मानव आणि प्राणी यांना दुखापत होऊ शकते, असे मंडळाने म्हटले आहे.
१. त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष पी.एस्. प्रशांत यांनी पत्रकारांना सांगितले की, देवाला अर्पण केलेल्या वस्तू आणि मंदिरांमध्ये प्रसादात ऑलिंडरच्या फुलांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी तुळशी, थेची (इक्सोरा), चमेली आणि गुलाब यांसारखी इतर फुले वापरली जातील.
२. अलाप्पुझा आणि पठाणमथिट्टा येथे झालेल्या अनेक घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अलाप्पुझा येथील एका महिलेचा नुकताच ऑलिंडरची फुले आणि पाने खाल्ल्याने मृत्यू झाला. पाथनमथिट्टा येथे ऑलिंडरची पाने खाल्ल्याने गाय आणि वासरू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !