या फुलांमुळे विषबाधा होत असल्याने बंदी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील त्रावणकोर देवस्वम बोर्ड (टीडीबी) आणि मलबार देवस्वम बोर्ड यांनी मंदिरांना प्रसादासाठी ‘ऑलिंडर’ फुलांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या फुलांच्या विषारी स्वरूपाबद्दल चिंता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या फुलांमुळे मानव आणि प्राणी यांना दुखापत होऊ शकते, असे मंडळाने म्हटले आहे.
१. त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष पी.एस्. प्रशांत यांनी पत्रकारांना सांगितले की, देवाला अर्पण केलेल्या वस्तू आणि मंदिरांमध्ये प्रसादात ऑलिंडरच्या फुलांचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी तुळशी, थेची (इक्सोरा), चमेली आणि गुलाब यांसारखी इतर फुले वापरली जातील.
२. अलाप्पुझा आणि पठाणमथिट्टा येथे झालेल्या अनेक घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अलाप्पुझा येथील एका महिलेचा नुकताच ऑलिंडरची फुले आणि पाने खाल्ल्याने मृत्यू झाला. पाथनमथिट्टा येथे ऑलिंडरची पाने खाल्ल्याने गाय आणि वासरू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय