
नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी खंडपिठाने, ‘न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणाविषयी निकाल दिला आहे. त्यामुळे याचिककर्त्याने ही याचिका मागे घ्यावी अन्यथा न्यायालय ती रहित करेल’, असे म्हटले आहे. विनित मौर्य नावाच्या याचिकाकर्त्याने ही याचिका प्रविष्ट केली होती. ‘श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणावरून बौद्ध कलाकृती कह्यात घेण्यात आल्या होत्या. श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा निकाल देतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्ष २०१० मध्ये दिलेल्या निकालात याविषयी नमूद केले आहे. त्यामुळे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा आणि प्रमाणीकरण) कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये ही भूमी राष्ट्रीय पुरातत्व स्थळ म्हणून घोषित करावे’, असा युक्तीवाद मौर्य यांनी केला होता.
अयोध्या में राम मंदिर के निर्माण क्षेत्र को बुद्ध विहार घोषित करने की मांग से जुड़ी याचिका पर सुनवाई से सुप्रीम कोर्ट ने इनकार किया दिया है. #Ayodhya #RamTemple @Sehgal_Nipun #SupremeCourt https://t.co/jhVbEM5XYK
— ABP News (@ABPNews) February 3, 2023
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !