
नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला ‘अयोध्या बुद्ध विहार’ म्हणून घोषित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर हा खटला सुनावणीसाठी आला होता. त्या वेळी खंडपिठाने, ‘न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये अयोध्या प्रकरणाविषयी निकाल दिला आहे. त्यामुळे याचिककर्त्याने ही याचिका मागे घ्यावी अन्यथा न्यायालय ती रहित करेल’, असे म्हटले आहे. विनित मौर्य नावाच्या याचिकाकर्त्याने ही याचिका प्रविष्ट केली होती. ‘श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणावरून बौद्ध कलाकृती कह्यात घेण्यात आल्या होत्या. श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा निकाल देतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्ष २०१० मध्ये दिलेल्या निकालात याविषयी नमूद केले आहे. त्यामुळे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा आणि प्रमाणीकरण) कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये ही भूमी राष्ट्रीय पुरातत्व स्थळ म्हणून घोषित करावे’, असा युक्तीवाद मौर्य यांनी केला होता.
अयोध्या में राम मंदिर के निर्माण क्षेत्र को बुद्ध विहार घोषित करने की मांग से जुड़ी याचिका पर सुनवाई से सुप्रीम कोर्ट ने इनकार किया दिया है. #Ayodhya #RamTemple @Sehgal_Nipun #SupremeCourt https://t.co/jhVbEM5XYK
— ABP News (@ABPNews) February 3, 2023
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court