
नवी देहली – देशात ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात असल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक ५.४१ लाख हेक्टर वनभूमीवर अतिक्रमण झाले आहे. राजस्थानमध्ये १० सहस्र ८४० हेक्टर भूमी अतिक्रमित आहे. ‘राजस्थान पीपल फॉर अॅनिमल्स’चे बाबूलाल जाजू यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मिळवली.
मध्यप्रदेशच्या खालोखाल आसाममधील ३.६३ लाख हेक्टर भूमी, अरुणाचल प्रदेशमधील ०.५३ लाख हेक्टर, आंध्रप्रदेशमधील ०.३४ लाख हेक्टर, तर राजस्थानमधील ०.१० लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात आहे.
भाडेकरार संपूनही भूमी वन विभागाच्या कह्यात नाहीत !
काही वनभूमींचे भाडेकरार संपूनही त्या भूमी वन विभागाला परत करण्यात आलेल्या नाहीत. यावर सुस्त शासकीय यंत्रणांकडून अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. राज्य सरकारेही अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलत नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. वनसंरक्षकांना अधिकार आहेत; मात्र ते फारशी कारवाई करत नाहीत.
संपादकीय भूमिका
|
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !