
नवी देहली – देशात ७६७ लाख हेक्टर वनभूमी पैकी १३.३५ लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात असल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक ५.४१ लाख हेक्टर वनभूमीवर अतिक्रमण झाले आहे. राजस्थानमध्ये १० सहस्र ८४० हेक्टर भूमी अतिक्रमित आहे. ‘राजस्थान पीपल फॉर अॅनिमल्स’चे बाबूलाल जाजू यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मिळवली.
मध्यप्रदेशच्या खालोखाल आसाममधील ३.६३ लाख हेक्टर भूमी, अरुणाचल प्रदेशमधील ०.५३ लाख हेक्टर, आंध्रप्रदेशमधील ०.३४ लाख हेक्टर, तर राजस्थानमधील ०.१० लाख हेक्टर भूमी भूमाफियांच्या कह्यात आहे.
भाडेकरार संपूनही भूमी वन विभागाच्या कह्यात नाहीत !
काही वनभूमींचे भाडेकरार संपूनही त्या भूमी वन विभागाला परत करण्यात आलेल्या नाहीत. यावर सुस्त शासकीय यंत्रणांकडून अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. राज्य सरकारेही अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलत नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. वनसंरक्षकांना अधिकार आहेत; मात्र ते फारशी कारवाई करत नाहीत.
संपादकीय भूमिका
|
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !